मध्यान्ह
अखेरीस एक परीघ पूर्ण होऊन जाई
गमावण्यासारखं मग कुठे उरतं काही?
ममत्वाचा सूर आणि अपेक्षांचा पूर
क्षणामधे ज्याने काळीज होतं असे चूर
कुणावरची माया अन कशावरचा हक्क
पुन्हा पुन्हा ठेच लागून होणारं दुःख
ह्या सगळ्याच्या बरंच पल्याड निघून जाता
भरीव असं काही आता गवसू लागे हाता
मध्यान्हीचा प्रवास म्हणजे आता नाही धक्के
प्रगल्भतेच्या उजेडात कळती कोण सख्खे
अल्लडपण मिरवलं तसाच अनुभव मिरवू
आयुष्याचे धडे नव्या नजरेमधून गिरवू
©कल्याणी बोरकर
#kalyanismusings
#marathikavita

Comments
Post a Comment