Skip to main content

Posts

Showing posts from 2020

बाळंतपण

बाळंतपण ! बाळंतपण-आई होणं हा प्रत्येक स्त्री च्या आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा , हळवा पण आनंद देणारा , तिचे सगळे जग बदलून टाकणारा अनुभव असतो.ह्या बाळंतपणावरची ही खट्टी मिठी कविता . नऊ मासाच्या प्रतिक्षेनंतर पाहिलं त्याचं मुख आई म्हणून अनुभवलं मी ते जगावेगळ सुख ते रडलं आणि मी हसले असा होता तो क्षण आई म्हणाली पूर्ण झाला बाळंतपणाचा पण वाटलं राजा राणीचा पूर्ण झाला आता संसार काव्यात वगैरे बोलायचे तर त्याला आली बहार पण दोनच दिवसात मांडलेलं सगळं गणित फसतं कळून चुकत आई होणं इतकं सोपं नसतं कित्ती दिले तरी अपुरेच पडतात त्याला चौवीस तास सेंट आणि deo कुठले नुसता ‘शी’ आणि ‘शु’ चा वास हक्काचं माहेरपण आईबाबांनी ठेवलेली बडदास्त सगळ्यांना हे बाळ गोड पण मला मात्र देत त्रास कधी लागते उचकी तर कधी धरत श्वास कधी बिनसतं पोट तर कधी होतो gas जेवण केलय आज आईने आवडीचे खास पण सूर ह्याने काढला की माझा अडकतोय घास त्यातच इकडून तिकडून सूचनांचा पाऊस हे करून बघ त्याला आणि हे नको खाऊस डोक बांधून घे जरा कित्ती आहे पाऊस दिवे लागणी झाली आता बाहेर

नजर

              डोळे, संपुर्ण व्यक्तिमत्वात लक्षात राहतात असे.डोळे खूप बोलतात आणि असे बोलतात जे  कधी कधी शब्दही सांगू शकत नाहीत.तशाच आशयाची एक कविता "नजर".खूप पाहिलेल्या नजरा आणि त्याच्या वेगवेगळ्या छटा सांगणारी.                  नजर अशी एक नजर जिने केला कहर भाषा साऱ्या शरण आल्या करताना भाषांतर अशी एक नजर जिने केला कहर भिनत गेली अशी जसं भिनत जावं जहर अशी एक नजर जसा फुटे मायेस पाझर कोडग्या डोळा पाणी यावं दाटून यावा स्वर अशी एक नजर जिने केला कहर पाहता क्षणी गळून पडलं सारं एकवटलं बळ अशी एक नजर जिने केला कहर झाली नजरानजर दिसते तीच तिन्ही प्रहर अशी एक नजर जिने केला कहर मोहरून गेली स्वप्नं आला आयुष्याला बहर अशी एक नजर जिने केला कहर इतकी मिश्कील खट्याळ जशी विनोदाची लहर अशी एक नजर जिने केला कहर केविलवाणी,भुकेली मागते एक तुकडा भाकर अशी एक नजर जिने केला कहर अमानवी इतकी, काटा येई अंगावर अशी एक नजर जिने केला कहर करारी तेजस्वी सत्यवचनी प्रखर अशी एक नजर भिरभिरती चंचल न थारा आकाशी न टिके ती भुईवर अशी एक नजर जिने केला कहर नजरेतून मिळालं नेमकं हवं

आजोबा

आजोबांच्या खोलीत आता धुकं..धुकं...धुकं... आजोबांचं जग सगळं मुकं...मुकं...मुकं.. .. ही मंगेश पाडगावकर यांची " नसलेल्या आजोबांची असलेली कविता " जेव्हा पहिल्यांदा वाचनात आली होती,  तेव्हाही कविता वाचता वाचता खूप भरून आले आणि असे कध्धी होऊ नये असे वाटले, आज ही गोष्ट खरी आहे आणि खरच खूप भरून आलंय.३१ जानेवारी २०२० ला आजोबांना म्हणजे माझ्या बाबांच्या  बाबांना ९२ व्या वर्षी  देवाज्ञा झाली आणि ह्या १२ दिवसात दोनदा रत्नागिरीला गेल्यावर कित्येक आठवणी मनात फेर धरत राहिल्या, सगळे बालपणच जणू परत जागं होऊन भोवताली दिसत होतं..लाडक्या आजोबांच्या काही आठवणी आज जमतील तशा मांडणार आहे. लहानपणी मी आमच्या घरच्या नातवंडांमध्ये सगळ्यात मोठी त्यामुळे आजोबांची सर्वात लाडकी नात  होते लाडाने ते मला कल्याण म्हणत असतं आणि मी दिसले की 'कल्याण करी रामराया' हे गाणं गुणगुणत, .त्यांची अतिशय  लाडकी लेक  म्हणजे  माझी आत्त्या 'वर्षा' जी ठाण्याला असते.... तिची त्यांना आठवण  येत असली की मलाच ते कधीकधी कल्याण ऐवजी  'वर्षाराणी' म्हणून हाक मारायचे आणि म्हणायचे 'अरे मला वाटले व